(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - temp

Sort By:

  • किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग १

    दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

  • महालावणी महोत्सव

    मित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.

  • महालावणी महोत्सव भाग ४

    लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…

  • रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग २

    डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक एकमेकांपासून भिन्न करता येणारच नाहीत. ‘कट्यार’मुळे वसंतराव देशपांडे यांना उदंड लोकप्रियता मिळाली की वसंतरावांमुळे कट्यार आणि नाट्यसंपदा लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, हे सांगता येणे कठीणच.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ७

    अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.

  • रामकृष्ण नायक अभिवादन

    मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग ६ मदनलाल धिंग्रा

    बंगालची क्रांतीज्योत पंजाबात पोहोचली. सरदार भगतसिंगचे आजोबा अर्जुनसिंग, वडील किशनसिंग, काका अजितसिंग व पंजाब केसरी लालालजपतराय यांनी ती पेटवली आणि अनेकांनी आपल्या देहाचा अग्नी देऊन ती तेवत ठेवली.

  • राजा परांजपे अभिवादन – रमेश देव, सीमा आणि एक धागा सुखाचा भाग २

    सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.

  • एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव

    लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत…

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १९- सूर्यसेन आणि सुभाषबाबू

    भारतीय स्वातंत्र्यलढयातल्या क्रांतीच्या तिसऱ्या पर्वाचे बिनीचे शिलेदार होते सूर्यसेन….या पर्वात सर्वात दुर्घर्ष रणधुमाळी माजली 18 एप्रिल 1930 रोजी! सूर्यसेन यांनी चटगाव चक्क स्वतंत्र करून सोडलं! दुसरं महायुद्ध पेटलं! गुलाम भारताला स्वतंत्र होण्याची दुसरी संधी आली.