(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - temp

Sort By:

  • पारंपरिक मराठी लावणी – भाग १

    पाऊस सुरू झाला आणि काही वर्षांपूर्वी मी केलेला वर्षालावणीमहोत्सव आठवला. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो खरं, पण आजची महाराष्ट्राची लावणी मराठीजनांनी अभिमानाने मिरवावी, अशी राहिली आहे का? लावणीतला घरंदाजपणा, कलात्मकता जाऊन आता काही कलाकार तिचं स्वरूप निव्वळ उथळ आणि स्पष्टच सांगायचं तर ‘बार डान्सिंग’च्या दर्जाचं करत आहेत. परंपरेतली लुप्त होत असलेली लावणी माहीत असलेले कलाकारही आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ११

    बागा जतीन, जलीयनवाला बाग रणांगणात, युद्धाच्या पवित्र्यात पाय रोवून उभं ठाकणं हे क्रांतीचं दुसरं पर्व ‘गदर’द्वाराच सुरू व्हायला हवं होतं, पण ते सुरू झालं गदरनंतर ओरिसात ! जुलमी राजसत्तेला डिवचून भूमिगत होण्याऐवजी मुखोमुखी लढा देण्याची सुरुवात केली – बाघा जतीन ऊर्फ जतीन्द्रनाथ मुखोपाध्याय यांन ! बाघा जतीन यांनी ब्रिटीश सैन्यांशी हातघाईची लढाईच लढली.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १५ – चंद्रशेखर आझाद.

    अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले.

  • श्रीकौपीनेश्वराष्टक (शिवस्तुती)

    भगवान श्रीशंकरांच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे नगरातील श्रीकौपीनेश्वर मंदिर. सुमारे हजार-बाराशे वर्ष पुरातन अशा या मंदिरातील शिवलिंग महाराष्ट्रातले सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते.

  • ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर

    मराठी संगीत रंगभूमीवर स्वतःची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

    त्यांच्या जाण्याने पारंपरिक संगीत रंगभूमी आणि नव्या विचार-आशयांची संगीत रंगभूमी यांना जोडणारा दुवा निखळला आहे.
    2012 साली महाराष्ट्र राज्य शासनाने संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला होता. त्यावेळी त्यांच्या गौरवपर सादर झालेल्या चित्रफितीद्वारे त्यांच्या कार्याला वंदन करूया.

  • दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग १

    ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा

    दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासुन सुरु झालेली ही यू-ट्यूब मालिका, आज प्रजासत्ताक भारताच्या घटना समितीपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची नियुक्ती झाल्यादिनी म्हणजेच दि.29 ऑगस्ट रोजी लोकार्पित करीत आहोत. अमृतमहोत्सवी वर्षात विषयानुरूप अनेक उपक्रम करणं शक्य आहे. क्रांतिकथाकथन स्पर्धा, क्रांतिगीतगायन स्पर्धा, देशभावना वाढीस लागेल, या दृष्टीनं स्वतंत्र साहित्यनिर्मिती आणि कलाविष्कार शक्य आहेत. महाराष्ट्राला पोवाड्याची मोठी परंपरा आहे पण काही अपवाद वगळता शिवकाळातच रमलेल्या शाहिरांना अमृतमहोत्सवनिमित्त क्रांतिकारकाच्या कार्यावरचे उत्तम पोवाडे लिहीण्यासाठी प्रवृत्त करता येईल.

  • किशोरताई सांगीतिक संवाद – भाग ३

    किशोरीताईंची सांगीतिक जडणघडण कशी झाली, विशेषतः गळ्यावर सुरांचे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी काय केले, विविध वाद्यातून येणारे सूर कंठस्थ करण्यासह राग आणि वाद्य यांच्या संबंधाबाबत त्यांची मतं आज ऐकुया…..

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १०

    छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे तो शौर्याचा, पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा. देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱया शूरवीरांची ही भूमी. या भूमीत जन्माला आलेल्या अनेक वीरांनी १८५७च्या ही आधी जुलमी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र लढे दिले होते.

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग २०

    नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. स्त्रियांसाठी रानी ऑफ झांसी रेजिमेंट उभारलं. दि. 24 ऑक्टोबर 1943 दुपारी सव्वाबारा वाजता अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा प्रथम राष्ट्रपती सुभाषबाबूंनी केली. दोन महिन्यात 30 डिसेंबरला अंदमान ताब्यात घेतलं! त्यानंतर अंदमान-निकोबार ते मणिपूर, इम्फालपर्यंत आझाद हिंद फौज विजयाचे ध्वज रोवीत सरसावली.