सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.
भारतीय संस्कृतीशी समरस झालेले ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक, विचारवंत आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते. महाराष्ट्र राज्य शासनाने फादरना शासकीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
बागा जतीन, जलीयनवाला बाग रणांगणात, युद्धाच्या पवित्र्यात पाय रोवून उभं ठाकणं हे क्रांतीचं दुसरं पर्व ‘गदर’द्वाराच सुरू व्हायला हवं होतं, पण ते सुरू झालं गदरनंतर ओरिसात ! जुलमी राजसत्तेला डिवचून भूमिगत होण्याऐवजी मुखोमुखी लढा देण्याची सुरुवात केली – बाघा जतीन ऊर्फ जतीन्द्रनाथ मुखोपाध्याय यांन ! बाघा जतीन यांनी ब्रिटीश सैन्यांशी हातघाईची लढाईच लढली.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.
मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं.
लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…
स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, वान्ची अय्यर यासह महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाबात अमरत्वाचे कुंभ घेऊन उडणार्या गरूडांच्या पंखात प्रेरणेचं आकाश भरणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विसाव्या शतकातल्या क्रांतीचे प्रणेते.
भगवान श्रीशंकरांच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे नगरातील श्रीकौपीनेश्वर मंदिर. सुमारे हजार-बाराशे वर्ष पुरातन अशा या मंदिरातील शिवलिंग महाराष्ट्रातले सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते.
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.
Copyright © 2025 | Marathisrushti