भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो
धुंद सागराच्या काठी पडे तुझी गाठ
एक एक स्वप्नांची या कशी लागली ही वाटअश एक स्वप्नांची ही असे ही कहाणी
तुझ्यावीण झालो जगती जरी मी विराणी ।।१।।
एक पाऊली तू जाता कापिते ही लाट
तुझ्यापाठी पाऊल माझे सांग कुठे जात अथांग या सागरी असती माणिके अनेक
परंतु हाती माझ्या येती शिंपले नि शंख ।।२।।
तुझ्या येई मागे जरी मी कंपितो ही दीप
तुटोनिया जरी हे जाती युयुत्सुची पांखअथांग हा सागर खाली अनंत हेचि विश्व
जाणण्यास अधीरी जरी मी गूढ तुझे स्वत्व ।।३।।
दावी एकदा तू मजला तुझे गोड रूप
तुझ्यावीण नाही मजला अन्य काही सूखएकदाची सागरतीरी एकदाची दावी
विश्वरुप घेण्याआधी तूर्त तुझी काळी ।।४।।
-- जयंत वैद्य
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.
जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
तुजविना करमेना मज होई लाही
जयदेवी जयदेवी ......... !!
तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या
जयदेवी जयदेवी..... ।।१।।
अर्धांगी गायी ते अंगाई गीत
होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत
अखेरी वाचीत बसतो कविता
तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
जयदेव जयदेवी.... ।।२।।
व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
बेरके कवडे काहीही बोले
परंतु तुजला दयेचा लेश
तुजला लाजला शिव महेश
जयदेवी जयदेवी .......।।३।।
आता मात्र बाबा कमाल झाली
निद्रेवाचून होई जीवाची लाही
घेऊन हातात कवितेचे बाड
माझेच बसलो करीत लाड
जयदेवी जयदेवी ..... ।।४।।
लागली लागली तुझी चाहूल
तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
वाचीत वाचीत झोपून गेलो
दिव्याची आठवण विसरून गेलो
जयदेवी जयदेवी ..... ।।५।।
-- द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)
दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।।
येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।।
आज अशी तु उडुनी पाखरा पंख तुझे पसरले काळ चालला त्यास पकडण्या झेपावित चालेपरंतु तुझिया नेत्रा येईल जळ जेव्हा डवरून टाक अश्रू हे झोळी माझ्या जा तर उडून फिरुन
-- जयंत वैद्य
कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी
स्वप्नातल्या पर्यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी
मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।
ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार
मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार
चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती
स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान
कुठे हरवले परंतु माझे जिगरदोस्त दोन पुढे पुढे ते तसेच गेले रात्रीचे उचलुनी वाण
स्मृती गंधाच्या याच शलाका जाळीत जाती जीवा आज तडफडे जीव तयास्तव तृणवत मम ठेवा
-- जयंत वैद्य

आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti