महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.
मुंबईच्या समुद्र किनार्यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो.
टेंपल ऑफ हेवन हे मंदिर बीजिंग शहरात आहे. इ.स. १४२० ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मोंग आणि क्विंग या राज्यकर्त्यांचे वारसदार या मंदिरात चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात.
उद्योगविश्वात मुंबापुरी “उद्योगनगरी” म्हणून ओळखली जाते. देशाच्या कानाकोपर्यातून येथे मोठया संस्थेने लोक रोजीरोटी कमावण्यासाठी येतात.
उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे जामफळ. पांढऱ्या शुभ्र रंगाचे घंटेसारख्या आकारातील हे फळ फारसे गोड नसले तरी त्याची चव छान असते. त्यापेक्षाही त्याचे गुणधर्म शरीलाला पोषक असतात.
दहा रुपयात डझनभर फळ घेतल्यावर प्रवासात फारशी तहान जाणवत नाही.
बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे.
या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत अलमास शाह उर्फ कमलीवाले बाबा यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येथे उरुस साजरा केला जातो. हा उरुस म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते.
मुंबई येथे प्रसिध्द आहे. या म्युझिअमसह कावसजी जहांगीर हॉल व गेट वे ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय ब्रिटीश वास्तुविशारदा जॉर्ज विटेट यांना जाते. या वास्तू पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत. ::
चेन्नई हे तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे शहर असून, दक्षिणेतील मोठे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. चेन्नई हे देशातील पाचवे मोठे शहर असून, तिसरे मोठे बंदर आहे.
सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
एके काळी पुण्याचे उपनगर मानले जाणारे पिंपरी-चिंचवडची ओळख आता पुण्याचे जुळे शहर अशी करुन दिली जाते. या शहरात फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. टेल्को, बजाज, फिलिप्स यासारख्या मोठमोठ्या उद्योग समूहांचे येथे कारखाने आहेत.
२०११ साली या शहराची लोकसंख्या १७ लाख होती. समुद्रसपाटीपासून ५३० मीटर उंचीवर हे शहर वसलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti