(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • मुंबई : रणजीचे राजे

    भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली.

  • आठवडी बाजार

    रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात.

  • कलाकार

    त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट!

  • आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

    आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय

  • रंग चिकित्सा – भाग ४ 

    रंगांसंबंधी आपण गेल्या तीन लेखांद्वारे माहिती घेतली. या लेखात आपण सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र “अश्विनी”याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो त्यावर माहिती मिळवु.

    ह्या नक्षत्रावर ज्या व्यक्तिचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तिने दैनंदिन व्यवहारात कोणकोणत्या बाबींचा विचार केल्यास अधिक सकारात्मक तसेच होकारात्मक वातावरण तयार होऊन स्वतःच्या कामांना अधिक गतिमान करता याचा विचार करावा…!!

  • अमिताभला मृत्यूने मारलेला पहिला ठोसा

    मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होते.
    अमिताभ नेहमीच सकाळी सात किंवा आठ वाजता डबिंग करतात. त्यांचा हा नियम गेले अनेक वर्षे ते पाळत आहेत. आजही ते सकाळी वेळेवर आले, पण स्टुडिओ बंद होता. सकाळची वेळ असल्यामुळे सोबत बॉडी गार्ड नव्हते. फक्त त्यांचा ड्रायव्हर थोड्या अंतरावर उभा होता आणि आम्ही दोघे स्टुडिओच्या कुलूपाकडे पाहण्यापेक्षा वेगळं काही करू शकत नव्हतो.

  • गोर्‍हे

    महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे.

  • हिरवं थर?

    भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत.

  • आडनावाची गरज का ?

    कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे.

  • छत्रपती संभाजी महाराजांवरील “झंझावात” कादंबरी

    छत्रपती संभाजी महाराजांवरील “झंझावात” या ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्‍या माझ्या आगामी कादंबरीतील एक लेख