(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • सावलीपासून वीज!

    सौरऊर्जेशी आपला व्यवस्थित परिचय आहेच. यात सूर्यकिरण विशिष्ट प्रकारच्या पट्ट्यांवर पडल्यावर वीज निर्माण होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सावलीपासून अशी ऊर्जा निर्माण करणे शक्य झाले आहे. अर्थात अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासठी सावलीबरोबरच प्रकाशाचीही गरज असते. सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनाचा काही भाग हा सावलीत ठेवलेला असतो, तर काही भाग हा प्रकाशात असतो.

    सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या साधनाप्रमाणेच, सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनातही सिलिकॉन या मूलद्रव्याचा वापर केलेला असतो. हे सिलिकॉन अतिशय पातळ अशा थराच्या स्वरूपात असते व त्यावर सोन्याचा थर दिलेला असतो. जेव्हा या साधनाचा काही भाग उजेडात आणि काही भाग सावलीत असतो, तेव्हा उजेडात सिलिकॉनच्या थरातून इलेक्ट्रॉनची निर्मिती होते व हे इलेक्ट्रॉन सोन्याच्या थराद्वारे टिपले जाऊन विद्युतप्रवाहाची निर्मिती होते. (विद्युतप्रवाह म्हणजे काय तर अखेर इलेक्ट्रॉनचा प्रवाह!) सौरऊर्जेच्या बाबतीत, सूर्यकिरण जितके प्रखर, तितकी विद्युतनिर्मिती अधिक. सावलीतून वीज निर्माण करणाऱ्या साधनात मात्र , आता प्रकाशित भाग आणि सावलीचा भाग यातील फरक जितका जास्त तितकी विद्युतनिर्मिती अधिक.

    सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातील टॅन स्वी चिंग यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने हे विजनिर्मितीचे साधन निर्माण केले आहे. अशा प्रकारच्या आठ साधनांचा वापर करून या संशोधकांनी अंधूक प्रकाशातसुद्धा इलेक्ट्रॉनिक घड्याळ चालवण्यास लागते तितकी ऊर्जा निर्माण करून दाखवली. टॅन स्वी चिंग आणि त्यांचे सहकारी आता अशा प्रकारचे अधिक कार्यक्षम साधन बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. टॅन स्वी चिंग यांच्या मते हे साधन पृथ्वीच्या पाठीवर कुठेही उपयोगात येऊ शकते. यावरचे टॅन स्वी चिंग यांचे भाष्य गमतीशीर आहे. ते म्हणतात, “लोकांच्या मते सावली ही निरुपयोगी गोष्ट आहे… परंतु प्रत्येक गोष्ट ही उपयोगाची असते, अगदी सावलीसुद्धा!”.

    चित्रवाणी:

    https://www.youtube.com/embed/69qm028vwqY?rel=0

    -- डॉ. राजीव चिटणीस.

    छायाचित्र सौजन्य: pxhere.com

  • सावधान श्रीकृष्ण जिवंत आहे

    कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
    एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ

  • प्रवासी शार्क

    शार्कसारख्या माशांना चुंबकीय क्षेत्राची जाणीव असल्याचं, संशोधकांना पूर्वीच समजलं होतं. ही जाणीव त्यांच्या शरीरातील लोहयुक्त स्फटिकांद्वारे होत असते, हेही संशोधकांना कळलं होतं. परंतु या माशांना ही फक्त जाणीव असते की या जाणिवेचा दिशाज्ञानासाठी उपयोग केला जातो, हे शोधणं महत्त्वाचं असल्याचं मत संशोधक गेली पाच दशकं व्यक्त करीत होते.

  • जटामांसी

    जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात.

    जटामांसीचे गुणधर्म आता आपण जाणून घेऊयात:

    हि चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की,स्निग्ध असते.हि प्रभावाने मानसदोष कमी करते.

    आता आपण जटामांसीचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जटामांसी थंड असल्याने पाण्यात वाटून हिचा लेप लावल्यास दाह कमी होतो.

    २)घामाच्या दुर्गंधीमध्ये जटामांसीचा लेप शरीरावर करावा.

    ३)जटामांसी चवीला तुरट व थंड असल्याने केसांची मुळे बळकट करते तसेच सुगंधी असल्याने केश्य म्हणून तेलात वापरतात.

    ४)जटामांसी निद्राजनन असल्याने झोपेच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.

    ५)जटामांसी चवीला कडू व हल्की असल्याने गर्भाशय शुद्ध करते व मासिक पाळी नियमीत करते.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जिवंत शुक्र!

    शुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला आहे. हा पुरावा, अलीकडेच शुक्रावर ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेल्याचं दर्शवतो.

  • शंभर वर्षांपुर्वीचं गिरगाव

    मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे.

  • केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळहातावर पण केस येतील अशा जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची वारेमाप विक्री झाली पण लवकरच त्याची हवा गेली. केसांसाठी मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. अॅडव्होकेट रत्नपारखींची “शेपटा” ही कविता वाचली की लक्षात येईल की एस.एस.सी.ला बसलेल्या एकाचं आयुष्य शुभदा जोशीच्या (काल्पनिक नाव) केसांमुळे कसं उध्वस्थ झालं. तिच्या काळाभोर केसांचा शेपटा बघत अख्खा पेपर बिचार्‍याने कोरा ठेवला.

    “एस एस सीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेशपेपर पहिला, घंटा पहिली, क्षण उत्सुकतेचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा

    मानेला ती देऊनि झटका नकळत सवईने, लिहू लागली पेपरमधली पानावर पाने

    मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार, तिचा तत्क्षणी येऊनि पडला माझ्या बाकावर

    तीन ताशी एकचित्त मी तिच्या शेपटात, एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात

    शेवटचीती घंटा झाली आलो भानावरी, कळले आता अपुले जीणे गावी खेड्यावरी

    शेतीवरती मोटेवरतो माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका

    केसानी त्या गळा कापला अलगदजी माझा, परि बैलांचा पिळुनि शेपटा जगतो हा राजा”

    . . . . . . . . कवी - अॅडव्होकेट रत्नपारखी

    बायकांना टक्कल का पडत नाही?

    शंभरात तीस टक्के पुरुषांना टक्कल पडलेले दिसते. पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. केस गळतात अशी तक्रार बायका करतात खर्‍या पण केस जसे गळतात तसे नवीनही येतात. म्हणून पूर्णपणे कॅरम बोर्ड झालेल्या स्त्रिया सहसा दिसत नाहीत. पित्त वाढल्यामुळे केस पातळ होणे, तांबूस रंगाचे होणे, अकाली टक्कल पडणे ही लक्षणे होतात. पित्त हे रक्तामध्ये निवास करते. मासिक पाळीच्या माध्यमाने दर महिन्यात थोडे रक्त शरिरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील पित्त दोष चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्याची निसर्गाची ही किमया स्त्रियांमध्ये आपोआप घडत राहते. ह्या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हॉर्मोन असते. हे हॉर्मोन उष्ण जातीचे असल्यामुळे शरीरात पित्त वाढवण्याचे कार्य करते. ह्या टेस्टोस्टिरॉन चे प्रमाण वाढले तर केस अधिकच गळतात. टेस्टोस्टिरॉन अधिक असल्यामुळे पुरुषांमध्ये कामशक्ती वाढते. म्हणूनच असे बघण्यात येते की टक्कल पडलेले पुरुष तुलनेने कामशक्ती मध्ये जरा अधिक सक्षम असतात. स्त्रियांमध्ये पण हे हॉर्मोन असते पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असते.

    केसांचे विकार

    केस गळणे, कोंडा होणे अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करुया. डोक्यावरचे जवळपास १० टक्के केस हे सुप्तावस्थेत असतात. ह्याला “रेस्टिंग फेज” असे म्हणतात ह्या रेस्टिंग फेजची जागा सतत बदलत असते. साधारण सहा महिने हे केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. ह्या काळात त्या केसांना पोषण मिळत नाही आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे थोड्याशा ताणामुळे ते केस गळून पडतात. मात्र इतर ९० टक्के भागात पोषण सुरु असते म्हणून हे केस वाढतातही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे.

    दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच्या खालची त्वचा (Scalp) ह्या भागाचा आजार आहे. फंगस नामक जिवाणूंमुळे हा त्वचेचा आजार होतो. अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. मिलेनिन नावाचे एक काळे रंजक द्रव्य केसाला काळा रंग देते. वय वाढत गेल्यावर हे मिलेनिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.

    केसांच्या समस्या – प्रमुख कारणे

    वर बघितल्याप्रमाणे ‘केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे’ हे केसांचे तीन प्रमुख विकार आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला किंवा अपघातामुळे फ्रॅक्चर वगैरे झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते. शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध म्हणजे तेल. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्‍यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण आजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्‍या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.

    केशस्वास्थ्याचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील हाडा-मासापासून तर नख-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील धातूंमध्ये त्याचे परिणाम आजाराच्या स्वरुपात दिसू लागतात. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच. आहारात काही घटक कमी-अधिक होत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते. केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मीठ म्हणजे केसांचा एक नंबरचा शत्रू. ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ मिठापेक्षा थोडे अळणी अन्न घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड ह्यांसारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळावेतच. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते.

    केसांच्या सुयोग्य पोषणासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व कॅल्शियमची नितांत आवश्यकता आहे. दूध, मांसाहार, द्विदल धान्य, सोयाबीन अशा पदार्थांमध्ये सकस प्रथिने असतात. तीळ, पालेभाज्या, केळी, संत्री, बदाम, कोबी, फ्लॉवर सारख्या अनेक गोष्टींमध्ये प्रचुर प्रमाणात कॅल्शियम असते. संपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्यांनी ह्यांचे सेवन आहारात नियमितपणे केले पाहिजे.

    अनुवांशिकता हे केसांच्या विकारांचे एक प्रमुख कारण आहे. केस हा पित्रुज भाव असल्याने वडिलांच्या गुणसूत्रानुसार ह्याचे स्वास्थ्य असते. अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस ज्या विशिष्ट वयात गळू लागले त्याच वयात मुलांमध्येही केस गळती सुरु होऊ शकते.

    मानसिक ताण, चिंता, क्रोध हे केसांच्या समस्यांचे महत्वाचे कारण आहे. अशा मानसिक असंतुलनामुळे कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन ह्यांची वाढ होऊन केसांना धोका संभवतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही वनस्पतींच्या सेवनाने ह्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते.

    प्रदूषण हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनेशन करण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीत क्लोरिनचे प्रमाण अधिक झाले व केस धुण्यासाठी असे पाणी वापरले तर केस गळती झपाट्याने होऊ लागते. ह्यावर सोपा उपाय म्हणजे स्नानासाठी वापरावयाचे पाणी २ – ३ तास बादलीत काढून ठेवावे. ह्याने त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते व केसांना होणारी इजा टाळता येते. प्रदूषित हवा, त्यातील कमी झालेले प्राणवायूचे प्रमाण व वाढलेले इतर घातक वायु हे असंतुलन रोखणे जवळजवळ अशक्यच आहे. निसर्ग संगोपन, वृक्षारोपण व संवर्धन हे ध्येय प्रत्येकानेच पाळणे नितांत गरजेचे आहे.

    केसांची निगा – समज / गैरसमज

    केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शांपू आणि तेल ह्याशिवाय काही उपचार असू शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार. ह्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय योग्य आहे हेच कळेनासं होतं.

    “कोणता शांपू चांगला?” अशी विचारणा बरेच लोक करतात. मुळात शांपूचा उपयोग काय हे लक्षात घेतले पाहिजे. शांपू हा फक्त केस धुण्यासाठी वापरला जाणारा फेसाळणारा साबणासारखा (इमल्सिफायर) पदार्थ आहे. केसांवरील तेलकट अंश ह्यात विरघळतो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त काही सेकंद असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरी त्या ठिकाणच्या त्वचेवर राहिले पाहिजे. शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही.

    हर्बल शांपू प्रकाराचे प्रस्थ सध्या फार वाढलेले दिसते. ह्या हर्बल शांपूमध्ये वनस्पतींच्या अर्काचा फक्त थोडासाच अंश असतो, बाकी सर्व रसायनेच असतात. रासायनिक घटक असल्यामुळे ते वाईट असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात वास्तविक काहीच नसते. केसांना मुलायम (हेअर सॉफ्टनिंग) करणारे, चकाकी (ग्लॉस) देणारे शांपूही आजकाल मिळतात. ह्या शांपुंमध्ये मुख्यतः रासायनिक स्निग्ध पदार्थ असतात, जे केसांना मुलायम करतात, गुंतागुंत होऊ देत नाहीत व चकाकी देतात. तरीदेखील हा कृत्रिमपणा केसांच्या स्वास्थ्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा आहे. शांपूचा दर्जा ठरतो त्याच्या pH वरून. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे.

    केसांसाठी तेल आवश्यक आहे खरे, पण ते केवळ केसांना वर वर लावून उपयोगी नाही, तर ते मुळाशी शोषले जाणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत होतो. आयुर्वेदाच्या तत्वानुसार नाक हे शिरोभागाचे द्वार आहे. त्यातील यंत्रणा व श्लेष्मल स्तरांमधून द्रव्याचे शोषण होते.

    पुढचा महत्वाचा भाग आहे औषध पोटातून घेण्याचा. पोटात घेतलेल्या औषधी द्रव्यातील कार्यकारी घटक रक्ताद्वारे केसांच्या मुळांमार्फत केश संरक्षण व वर्धन करून अस्थि धातु पोषणाचेही कार्य करतात. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. आयुर्वेदात काही विशिष्ट वनस्पती व औषधी द्रव्ये ह्यासाठी वर्णित आहेत. ह्यांच्या सेवनाने अगदी ५ - ६ दिवसांतच फरक दिसू लागतो असे अनुभव प्राप्त झाले. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. ही औषधे ३ महिने सातत्याने घेतल्यावर १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा चालू करावीत. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.

    केशप्रभा – केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रभावी गोळ्या

    गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.

    केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी शारीरिक, मानसिक, आहार, विहार व औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून अक्षय उद्योग समूहाने ‘केशप्रभा’ नावाचे एक अभिनव उत्पादन वटी स्वरुपात सादर केले आहे. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता देण्याचा प्रयत्नही केला आहे. केसांच्या स्वास्थ्यासाठी केशप्रभा गोळ्यांमधील प्रत्येक औषधी कशी कार्य करते ते आता पाहूया.

    प्रत्येक विलेपित गोळीतील घटक द्रव्य व प्रमाण

    कृष्णसारिवा, माका प्रत्येकी ८० मिलिग्रॅम, ब्राह्मी, गुडुची प्रत्येकी ७० मिलिग्रॅम, गोखरू, शतावरी, वटजटा प्रत्येकी ६० मिलिग्रॅम, सुवर्णमाक्षिक भस्म, मौक्तिक पिष्टी प्रत्येकी ३० मिलिग्रॅम; भावना वटजटा क्वाथ.

    कृष्णसारिवा : शारीरिक पेशींच्या जडणघडण प्रक्रियेत काही विषारी घटक सतत उत्पन्न होत असतात. त्यांना काबूत ठेवण्यासाठी शरीर आपणहून प्रयत्नशील असते. तरीदेखील सदोष आहार, उग्र रासायनिक घटकांचा संपर्क, चुकीची जीवनशैली अशा कारणांमुळे चयापचयातून अतिरिक्त विषारी घटक निर्माण होतात. ह्यांना पेशीविघातक (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. ह्या फ्री रॅडिकल्समुळे केसांच्या स्वास्थ्यावर घातक परिणाम होतात, केस झपाट्याने गळू लागतात, पांढरे होतात. कृष्णसारिवा वनस्पतीमध्ये फिनाइलप्रोपेनॉइड नामक पेशीरक्षक घटक असतो. हा घटक फ्री रॅडिकल्सना उत्तमप्रकारे काबूत ठेवून केस गळणे थांबवतो.

    माका : केसांसाठी निर्मित उत्पादनात ही वनस्पती आवर्जून असतेच. माक्याचे केशवर्धक गुण विविध संशोधातून सिद्ध झाले आहेत. ह्याचा उपयोग बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे होतो. दोन्ही प्रकारात ह्यातील घटक रक्तात शोषले जाऊन केशवर्धनाचे अपेक्षित कार्य करतात.

    गुडुची : केसांच्या स्वास्थ्यासाठी गुडुची विविध प्रकारे उपयुक्त ठरते. रसायन असल्यामुळे शरीराच्या सर्वच धातूंना बळ देते. यकृताचे कार्य उत्तम राखण्यामुळे बाकीच्या अन्तःस्रावी ग्रंथींवर नियंत्रण राखून हॉर्मोन्सचे संतुलन उत्तम राहते. हॉर्मोन्सचा संबंध केसांच्या स्वास्थ्यासाठी सर्वमान्य आहेच. सीबम हा त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ आहे. केसांचे पोषणही त्वचेच्या माध्यमातूनच होत असल्याने गुडुचीचे गुण केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतात. गुडुची ही अस्थि पोषणासाठी एक उत्तम वनस्पती आहे. अस्थिधातूचा केसांशी असलेला संबंध लक्षात घेता गुडुचीचा उपयोग अस्थिपोषणासाठी व परिणामी केसांच्या स्वास्थ्यासाठी सिद्ध होतो. फंगसच्या नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने केसातील कोंड्यासाठी देखील ह्याचा विशेष उपयोग होतो.

    गोखरु : केसांच्या व त्वचेच्या काळ्या रंगासाठी कारणीभूत असणारे रंजकद्रव्य म्हणजे मेलॅनिन. गोखरु सेवनाने मेलॅनिन स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (MSH) प्रेरित होते. शिवाय त्याने मेलॅनिन निर्मिती, त्वचेमध्ये पसरण्याची क्रिया व सुप्त मिलॅनोसाईट कोशिकांवर उत्तेजक क्रिया होते. केसांच्या कृष्ण वर्णासाठी ह्याच्या सेवनाने उत्तम लाभ होतो.

    शतावरी : इस्ट्रोजिन नामक हॉर्मोनचे संतुलन बिघडले तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. मासिक रजःस्राव नियमित होणे हे इस्ट्रोजिनचे संतुलन योग्य असल्याचे निदर्शक आहे. ज्या स्त्रियांमध्ये रजःस्राव अनियमित असतो त्यांना केसांचे विकार अधिक संभवतात. शतावरीमध्ये फायटो इस्ट्रोजिन्स असल्याने रजःस्रावाचे संतुलन राखले जाते व केस गळणे आटोक्यात राहते. पुरुषांमध्ये अल्प प्रमाणात असलेले इस्ट्रोजिनचे प्रमाण वाढले तर टेस्टोस्टेरॉन घटू शकते. शतावरीमुळे इस्ट्रोजिन्सचे संतुलन चोख राहते व पुरुष असो वा स्त्रिया, दोघांच्याही केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते.

    वटजटा : वडाच्या पारंब्यांचा उपयोग केसाच्या वाढीसाठी होतो. प्राप्त निष्कर्षानुसार केसांची जाडी ३१ % वाढते, १५ % नवीन केसांची निर्मिती होते तर संख्या सुमारे ४६ % वाढते.

    सुवर्णमाक्षिक भस्म : रस – रक्त – मांस – मेद – अस्थि – मज्जा व शुक्र असे सात धातु शरीराच्या धारणासाठी निसर्गाने निर्माण केले आहेत. सुयोग्य पोषण मिळाले तर सर्व धातु, उपधातु आणि मल सुदृढ राहतात. रक्त धातुमधील लोहाचे प्रमाण उत्तम राखण्याचे कार्य सुवर्णमाक्षिक भस्मामुळे होते. अर्थात पुढे त्यापासून निर्माण होणारे धातु-उपधातु सुस्थितीत राहून केस झडण्याची शक्यता कमी होते.

    मौक्तिक पिष्टी : अस्थि धातूचे परिपूर्ण पोषण करणारे सागराच्या कुशीतून निर्माण होणारे हे द्रव्य आहे. मौक्तिक म्हणजे मोती. ह्यामध्ये ८२ ते ८६ % एवढ्या मोठ्या मात्रेत कॅल्शियम आढळते. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी १० % कॅल्शियम हे रक्त संवाहनात असते तर ९० % अस्थिधातुमध्ये असते. म्हणून अस्थि पोषणासाठी कॅल्शियमची गरज सर्वात अधिक असते. निसर्गनिर्मित मोत्यांमध्ये असलेले कॅल्शियम उत्तम दर्जाचे असून मानवी शरीरात सहज शोषले जाते. अस्थींच्या पोषणाने अर्थातच केसांचे स्वास्थ्य उत्तम राहून हाडांनाही बळकटी मिळते.

    ब्राह्मी : मानसिक ताण, चिंता, भय अशा कारणांमुळे केसांचे विकार संभवतात. ह्या गोष्टींमुळे कॉर्टिकोस्टिरॉन आणि नॉरअॅड्रिनलीन नावाची हॉर्मोन्स वाढून केसांची गळती सुरु होते. ब्राह्मी सेवनाने कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन नियंत्रणात राहून केसांची गळती रोकण्यास हातभार लागतो. केस गळण्याच्या कारणांमध्ये थायरॉइड मधील T4 जातीच्या स्रावांची कमतरता हेदेखील महत्वाचे कारण आहे. ब्राह्मी सेवनाने ह्या T4 स्रावांची हळुवार वाढ होते व केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्राव जरुरीपेक्षा अधिक वाढत नाहीत, फक्त योग्य मात्रेत वाढ होईपर्यंतच ह्याची क्रिया घडते.

    केशप्रभा सेवन करण्याची पद्धत

    २ – २ गोळ्या दिवसातून दोन वेळा, सकाळी रिकाम्यापोटी व रात्री झोपतांना.

    वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर

    संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई

    फोन - +917208777773

    Email: drjalukar@akshaypharma.com

  • शनीचा गाभा

    शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं.

  • सी.टी. स्कॅन (बॉडी)

    सुरुवातीला काही वर्षे सी.टी. स्कॅन मशिन्स ही फक्त डोक्याचेच स्कॅन करीत असत; परंतु विज्ञानातील व मुख्यत: संगणक शास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे स्कॅनिंग होऊ लागले.

  • तणावमुक्त जगण्याचे इंगित

    “आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.

    माझ्या सुदैवाने काही चांगली ज्ञानी माणसे मला भेटली. काही चांगले साहित्य वाचनात आले. मग मी “परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवनासाठी” काय करावे लागेल याचा शोध सुरु केला. मी निश्चय केला की असाच मार्ग शोधायचा की नवीन तणाव न निर्माण होता, जो पूर्णपणे व्यवहार्य असेल. जो माझ्यासारख्या सर्व सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला सहजपणे आचरणात आणता येईल. जो मला हळूहळू का होईना बऱ्यापैकी “परिपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकडे” घेउन जाईल.