चहा हे उल्हसित करणारे नैसर्गिक पेय आहे. चहामध्ये कॅलरी नसल्यामुळे तुमची सुंदरता टिकवण्यासाठी आणि तुम्हाला फिट राखण्यासाठी चहा हे परफेक्ट पेय आहे. आपल्याकडे बहुतांश (सुमारे ९०%) लोक पितात त्याप्रमाणे म्हणजेच दूध मिश्रित चहा दिवसातून चार कप घेतल्यास आपल्याला सुमारे १७% कॅल्शिअम, ५% झिंक, २२% बी जीवनसत्व, ५% फॉलिक अॅसिड मिळते.
जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९० टक्के लोकांना पायोरिया हा आजार होत असतो. पायोरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होतो. किडलेला दातांसाठी रूट कॅन वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे दात वाचला जातो.
भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. सोलर वॉटर हीटर हा असाच एक पर्याय आहे. सोलर वॉटर हीटर तयार करताना जी कार्बनची निर्मिती झालेली असते ती या हीटरच्या वापराने ४-५ वर्षांत भरून निघते
डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप असते, तर डीएनए कॉम्प्युटर या नॅनोकॉम्प्युटरमध्ये ही जागा डीएनए सांभाळत आहे.
हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते.
साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.
समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.
परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.
उद्योग क्षेत्राला ही अवकळा का प्राप्त झाली, यामागच्या कारणांचा धांडोळा घेतल्यास असे आढळून येते की, उद्योगाचा वटवृक्ष तोलून धरणारी मुळंच कमजोर, जीर्ण झाली आहेत आणि दुदैवाने या मुळांकडे कुणी लक्ष पुरवायला तयार नाही. शासनाची जबाबदारी यासंदर्भात बरीच मोठी आहे, परंतु शासनदेखील वरवरची लिपापोती करण्यातच मग्न आहे. उद्योगाला चालना द्यायची म्हणजे नेमके काय करायचे, हेच मुळी शासनाला समजलेले नाही. पंचतारांकित अद्ययावत उद्योग परिसर उभा करणे, रस्त्यांवर चकचकीत प्रकाश फेकणारे दिवे लावणे, रस्त्यांच्या कडने फुलांचे ताटवे फुलविणे, असले प्रकार उद्योजकांना आकर्षित करतील असे शासनाला वाटत असेल तर ते नक्कीच मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत, असे म्हणावे लागेल.
नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Copyright © 2025 | Marathisrushti