Oct 16, 2025
अश्वत्थामा या महाभारतल्या एका अति महत्त्वाच्या पात्राने औत्स्युकतेची भूल घातली आहे. त्याचं चिरंजीवित्व हा अभ्यासाचा, उत्सुकतेचा, आश्चर्याचा असा विषय आहे.
अश्वत्थामा कोण होता आणि तो अजूनही कसा आहे, तो कुठे असतो, तो भेटतो म्हणे अनेकांना, तेल तुप मागत फिरतो आपल्या जखमेसाठी, त्याचा तो नीलमणी कसा होता, अशा अगदी अतिसाधारण प्रश्नांपासून ते त्याला श्रीकृष्णाने दिलेला हा शाप म्हणजे कलियुगातलं वरदान तर नाही ना ? कृष्णाचं यामागे नेमकं प्रयोजन काय, त्याचं अस्तित्व अजूनही माणसाला काही शिकवण्यासाठी रचलेला हेतुपरस्पर खेळ तर नाही ना ?
द्रोणाचार्यांचा हा पुत्र नेमका चुकलाच कसा? की त्या विधात्याने मुद्दामहून हा शापाचा फासा कलियुगाच्या अंतासाठीच पाडला?
असे गहन विचार करायला लावणारे अनेक प्रश्न अश्वत्थामा या एका शब्दापाशी अडकून पडतात.
महाभारतातील हा खलनायक आज कलियुगातही अनेकांना भेटतोच, पण मध्य भारतातील काही जमाती त्याला देव मानतात. त्याकाळात केलेल्या पापाचे तो या कलियुगात परिमार्जन तर करत नसावा?
मी अश्वत्थामा चिरंजीव या श्री अशोक समेळ लिखित कादंबरीच्या निमित्ताने उलगडलेला हा प्रवास…
‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे रु.१०००/- किमतीचे पुस्तक सवलतीत रु.७००/- मध्ये लेखक श्री अशोक समेळ यांच्या स्वाक्षरीसह मिळवण्यासाठी खालील मोबाईलवर संपर्क साधा :
संपर्क : ९३२०६ ६२४९७
मराठीसृष्टी : ९८२०३ १०८०3
इ-मेल : support@marathisrushti.com
(कुरिअर खर्च वेगळा)
- अश्वत्थामा बद्दल आकर्षण कसे निर्माण झाले?
- अश्वत्थामा लिहताना फक्त अस्थमभ्याचि भ्रमंती झाली का?
- अश्वत्थामा लिहताना कधी लिखाण अडवले गेले का?
- कृष्णाने तीन हजार वर्ष पृथ्वी तलावर रहायचा शाप दिला पण आजची त्याची मुक्तता झाली नाही असे का?
- महाभारतातील खलनायका बद्दल भूमिका कादंबरी काहीतरी वेगळेच दर्शवते
- त्या एका परीक्षकाचे वर्णन
- नंदुरबारमध्ये आदिवासी लोकांसाठी देव स्वरुप आहे अश्वत्थामा, पण अजूनही अश्वत्थामा गुप्त वासात का आहे?
- कुरुक्षेत्र अनुभव
- महाभारतातील नियम
- कृष्णानी साडे पाच हजार वर्ष उलटले तरी मुक्त का केला नाही
- कुरुक्षेत्रा मधील ते झाड
- निष्कर्ष आणि प्रेरणा