एक पिटुकला उंदीर होता. त्याने आपल्या बिळाबाहेरचे जग पाहिले नव्हते.. बाहेर जावे आणि सारे जग पाहून यावे असे त्याला सतत वाटत असे. एकदा त्याला त्याच्या आईचा मूड चांगल असल्याचे दिसले. त्याने पटकन आईला विचारले, ‘आई, मी जरा बिळाबाहेर फिरून येऊ का?” आई म्हणाली, ‘ हो जा ना. पण जरा सांभाळून जा बरं का?’ थोड्या वेळानंतर पिटुकला उंदीर बिळाबाहेरच्या जगात होता. तोच त्याला एक कोंबडा दिसला. कोंबड्याचा लालभडक तुरा आणि कर्कश आवाज ऐकून उंदीर घाबरला. तो घाबरून कोंबड्यापासून वेगाने दूर पळाला. त्याला वाटले हा भयंकर प्राणी दिसतो आहे.
मी एक गरीब सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे. मी माझ्या पत्नीसह काही दिवस रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत,मुलीचे लग्न झाले आहे आणि ते ती कुटुंबासह दूरच्या शहरात राहतात. तथापि, आम्ही दौऱ्यावर गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे, जर चोर आमच्या घरात घुसला तर घराची तोडफोड होईल, खोके, कपाट आणि कॅबिनेटमधून चोरटे उडाले तर घराचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश झाल्यास आमच्या सामानाचे नुकसान करू शकेल, अशी भीती आम्हाला वाटत होती.
हॉलमध्ये तुफान गर्दी .
सगळीकडे झगमगाट .
फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलाय की टेलर ने वाकडी तिकडी कैची चालवून शिवलेल्या वस्त्राला फॅशन म्हणून स्वीकारलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन. परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट. काहींच्या तोंडी, त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा सुवास.
हातात कुणीतरी कोंबलेला पेढा, सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना, मघाशी उगीचच स्माईल टाकून मानेसह अवघ्या शरीराला अनावश्यक हेलकावे देत अचानक जवळून गेलेली तरुणी गेली कुठं, या यक्षप्रश्नात गुंतलेले अनेक तरुण फ्रिज होऊन उभे.
लग्न कधी एकदा लागतंय याची अधिरतेने वाट बघणारे दोन गटात विभागलेले .
एक नवरा नवरी. आणि दुसरे, मिष्टांन्नम् इतरे जना: l
आत्ताही तसंच झालेलं. माईकवरून जेवणाचं निमंत्रण घोषित झालं. आणि नवरा नवरीला विसरून गर्दी जेवणाच्या हॉलकडे धावू लागली .
पण काही चाणाक्ष आणि अनुभवी लोकांनी लग्न विधी सोडून मघाशी रांगेत उभं राहून मोबाईलमध्ये एक डोळा ठेवून दुसरा डोळा गेट केव्हा उघडत आहे यासाठी सजग ठेवलेला. अखेर तो क्षण आलाच. गेट उघडलं. आणि मग, पळा पळा कोण पुढे पळे तो …ची शर्यत सुरू झाली बुफे असल्याने सराईतानी रांग लावताना कोणकोणते पदार्थ आहेत, बॉउल्स किती घ्यावे लागतील याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. नंबर येईपर्यंत काय करायचे म्हणून काहींची ओळखपाळख काढून स्माईल्स ची देवाण घेवाण.
“अरे व्वा , खूप वर्षांनी भेटतोय, या वर्षीचा पाऊस, उन्हाळा, थंडी, राजकारण …” अशा निरर्थक गप्पांमध्ये रंगतोय असं दाखवत रांग अजून का पुढं सरकत नाही म्हणून काहीसे काळजीत असणारे अजून काही .
हा लेख अनघा प्रकाशनच्या दिवाळी २०२३ मधून घेतला आहे.
मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टपणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत.
त्यातील सर्वात मोठी कुरघोडी म्हणजे लिंगबदल शस्त्रक्रिया… त्याचे समर्थन करताना काही महाभाग महाभारतातील श्रीखंडीचे उदाहरण देतात. पण त्यांना हे कळत नाही. श्रींखडीनी स्त्रीची पुरुष तिच्यात पुरुषाच्या लैंगिक भावना होत्या म्हणून झाली नव्हती तर आपला बदला घेण्यासाठी झालेली होती.
आमच्या गाडीने मलकापूर सोडलं आणि कोकरूडमार्गे पुण्याला जाण्यासाठी गाडी वळली . पावसाची हलकी सर पडून गेली होती . गाडीने गती घेतली .पुढच्या उतारावर खूप छान दृश्य होतं . मोकळ्या रस्त्यावर दोन चिमण्या ,रस्त्यावरच्या अगदी लहानशा खड्यात साठलेल्या पाण्यात चोच बुडवून तहान भागवत होत्या . दृश्य खरंच मनोवेधक होतं. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ .डाव्या हाताला एक घर .डांबरी सडक नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरीमुळं ताजीतवानी झालेली . हवेत छानसा गारवा .आणि दूरवर क्षितिजापाशी निळ्या ढगांच्या आश्रयाला आलेले तुरळक काळे ढग .
प्राचीन काळातील गोष्ट. विंध्यच्या एका गावात चार चोर राहात होते. त्या गावाबाहेरच्या जंगलात एक साधू राहात होता. साधू गावाजवळच्या शिवालयात पूजा करायला जात असे व तेथील प्रसादावर आपली उपजीविका करीत असे. चोर साधुकडे जात असत आणि आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून गरिबीमुळेच आपण चोरी करतो असे साधूला सांगत असत.
Copyright © 2025 | Marathisrushti