नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शाही सोहळ्यासाठी मिलिंद गुणाजीने चाळीस लाख रुपये खर्च करुन, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडी मंडळी व खास पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला..
मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी, लाॅस एंजलिस येथे झाला. तिचं बालपण मात्र अनाथाश्रमात गेलं. नंतर अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षापासून तिनं माॅडेलिंग सुरु केलं. १९४६ साली तिनं चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चार वर्षांच्या परिश्रमानंतर तिला प्रसिद्धी मिळू लागली.१९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायगारा’ चित्रपटाने ती प्रकाशझोतात आली. १९५५ मधील तिच्या ‘सेव्हन इयर इच’ या चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. याच चित्रपटावरुन ‘सखी शेजारिणी’ हे मराठी नाटक बेतले होते. १९५९ सालातील ‘समलाईक इट हाॅट’ या चित्रपटाने तिला सर्वोच्च असा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळवून दिला.
२७ फेब्रुवारीला दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या ‘पोस्ट’ एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं ‘मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं’ काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. तरच ही ‘अमृताहून गोड’ भाषा टिकून राहील. सकाळी उठलं की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती l करमुले तू गोविदः, प्रभाते करदर्शनम् ll असं एकेकाळी म्हटलं जायचं.
बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!
तिच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनची क्षणचित्रे एकापाठोपाठ एक येऊ लागतात. आंध्रमधील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. रामल्लू व सरसम्माच्या पोटी नको असताना जन्माला आलेलं हे अपत्य. घरच्या गरीबीनं तिला चौथीच्या पुढे शिक्षण घेऊ दिलं नाही. शाळा सुटली. ती आईला घरकामात मदत करु लागली.
आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
कोर्टाचे कामकाज सुरु झाले.
वीस वर्षांपूर्वी दिलीपची पहिली भेट झाली ती ‘हास्यवाटिका’ या द्विपात्री प्रयोगाचे डिझाईन करण्याच्या निमित्तानं. त्याच्या आधी त्यानं संजय डोळे बरोबर ‘माणसं अशी वागतातंच का?’ या द्विपात्री प्रयोगाचे शेकडो शो केले.

अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच!

पेशन्स इज द की….

आकाशवाणीनं आयोजित केलेल्या अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. माझ्या डेथ ऑफ कॉमनसेन्स या नभोनट्याला अखिल भारतीय स्तरावरचा प्रथम क्रमांक मिळाला होता , त्याचे चौदा भारतीय भाषांत भाषांतर झाले होते. ते पारितोषिक दिल्लीत स्वीकारताना असाच टाळ्यांचा गजर झाला होता. यशाची सुरुवात गोगटे महाविद्यालयात झाली होती आणि केंद्र शासनाच्या पुरस्काराने त्या यशाला झळाळी लाभली होती .
Copyright © 2025 | Marathisrushti