पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर््या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला. सुरुवातीला ते त्याला ‘बंगालीबाबू? म्हणायचे. हा बंगालीबाबू लवकरच मराठी शिकला आणि इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाला. गणपती, होळी साजरी करू लागला.
Copyright © 2025 | Marathisrushti