अंगाची लाही लाही करणाऱ्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात सर्वजण पावसाळयाची आतुरतेने वाट पाहत असतात. आगमनाविषयी अनिश्चितता असली तरी जूनच्या सुरुवातीला आपल्याकडे धडकणारा पाऊस येताना आल्हाद, गारवा घेऊन येतो. मात्र हा गारवा, ओलावा येताना अनेक आजारही घेऊन येतो. जरा एक दोन सरी पडल्या नाही की लगेच जवळच्या पर्यटन स्थळी जाऊन भिजायचं, भजी, वडापाव सारख्या पदार्थावर ताव मारायचा, असा जणू काय सध्या ट्रेंड झालेला दिसतो.
चहा हे उल्हसित करणारे नैसर्गिक पेय आहे. चहामध्ये कॅलरी नसल्यामुळे तुमची सुंदरता टिकवण्यासाठी आणि तुम्हाला फिट राखण्यासाठी चहा हे परफेक्ट पेय आहे. आपल्याकडे बहुतांश (सुमारे ९०%) लोक पितात त्याप्रमाणे म्हणजेच दूध मिश्रित चहा दिवसातून चार कप घेतल्यास आपल्याला सुमारे १७% कॅल्शिअम, ५% झिंक, २२% बी जीवनसत्व, ५% फॉलिक अॅसिड मिळते.
रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळ काढायलाच हवा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत याबद्दल
आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. यात आलं, सुंठ आहेत. आणि गवती चहा हे पदार्थ महत्वाचे आहेत.
जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९० टक्के लोकांना पायोरिया हा आजार होत असतो. पायोरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होतो. किडलेला दातांसाठी रूट कॅन वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे दात वाचला जातो.
सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.
Copyright © 2025 | Marathisrushti